पुलवामा चा सर्वाधिक फायदा कुणाला झाला? राहुल गांधी

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट केलं. या ट्वीटद्वारे त्यांनी भाजप सरकारला तीन प्रश्न विचारले आहेत. पुलवामा हल्ल्याचा सर्वात जास्त फायदा कुणाला झाला? असा प्रश्नही राहुल गांधींनी उपस्थित केला आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं की, “आज आपण पुलवामा हल्ल्यातील सीआरपीएफच्या 40 शहीद जवानांना आठवतो, त्यावेळी आम्ही हे विचारतो. या हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कुणाला झाला? या हल्ल्याच्या तपासातून काय निष्पन्न झालं? ज्या चुकांमुळे दहशतवादी झाला, त्यासाठी भाजपा सरकारमधील कुणाला जबाबदार धरण्यात आलं?”